मित्रांनो प्लास्टिक हे पर्यावरणाला अत्यंत घातक आहे म्हणून त्यावरील बंदी ही योग्यच आहे. आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या ह्या पाण्यात विरघळत नाहीतम्हणूनच वापरल्या जातात. त्याशिवाय त्या फेकून दिल्यावर मातीत सुद्धा सडून नष्ट होत नाहीत. त्यामुळे जरी आपण फेकल्या तरी त्या तश्याच राहतात

plastic carry bags
व घाणीचे साम्राज्य वाढत जाते. परंतु आपणाला ह्या पिशव्यांचे खूप आकर्षण असते. कारण त्या हाताळायला सोप्या असतात. बाहेर पडतांना महिला आपल्या पर्स मध्ये सहज घेऊन जाऊ शकतात. पुरुष मंडळी पेंटच्या खिशात कोंबून घेऊन जाऊ शकतात. व घरी ८-१० किलो

प्रत्येकाच्या हातात प्लास्टिक बेग
समान सहज आणू शकतात. पण ह्या प्लास्टिक च्या पिशव्या किती घातक आहेत हे मुंबईला २६ जुलैला साठलेल्या पाण्याने दाखवून दिले आहे. कित्तेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण आजच बाजारात खरेदी करण्यासाठी जायला लागलो आहोत का? आपले पूर्वज कधी बाजारातच गेले नव्हते का? त्यांचे काळात प्लास्टिक च्या पिशव्या नव्हत्या आणि ते बाजारातून समान घेऊन येत होतेच की. हे कसे काय शक्य आहे. त्यांनी पर्यावरला पोषक अश्याच पिशव्यांचा वापर केला होता. म्हणजे ते कापडी पिशव्या वापरीत होते. सर्वात छान म्हणजे कापडी पिशव्या. मग त्या घरातील जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या असल्या तर अतिशय उत्तम. कारण जुना कपडा फेकला तर त्याला सडून नष्ट व्हायला बराच वेळ लागेल. जर आपण त्याचे रिसायकल केले तर ते उत्तमच. आम्ही लहान असतांना तेच करीत होतो. आई जुन्या कपड्याच्या पिशव्या करून द्यायची त्या आम्ही शाळेत दप्तर म्हणून सुद्धा वापरत होतो. ते वापरणे म्हणजे इन-डायरेक्टली आपण पर्यावरण व्यवस्थित राहण्या साठी हातभार लावीत आहोत असाच अर्थ होतो. ते योग्य वाटत नसेल तर बाजारात भरपूर प्रकारच्या कापडी पिशव्या मिळतात त्या

paper carry bags
वापरता येतील. या पिशव्या वेगवेगळ्या रंगात मिळतात त्यामुळे आकर्षक दिसतात. त्यामुळे मित्रांनो पर्यावरला जपा आणि कापडी

कापडी पिशवी
पिशव्यांचा वापर वाढवा.
ओघाने एक लक्षात आले की जेव्हा १९९८ मध्ये मी जपानला गेलो होतो तेव्हा तेथे कागदी पिशव्या वापरल्या जात होत्या. अत्यंत आकर्षक बेग होत्या. २-३ बेग मी आणल्या होत्या पण त्या वापरीत असतांना पावसाने भिजल्याने नष्ट झाल्या. सांगायचा तात्पर्य त्या नष्ट होऊ शकतात. आज आपल्याकडे सुधा अश्या कागदी पिशव्या तयार होत आहेत. पण त्या काही वेळा वापरल्याने वापरण्यायोग्य राहत नाहीत. मात्र कापडी पिशव्या बराच काळ वापरता येतात. मी स्वप्न पाहत आहे की प्रत्येकाच्या हातात रिलायंस

paper carry bags
फ्रेशच्या नावाची कापडी पिशवी आहे. ज्यावर लिहिले आहे “कृपया खरेदीला पुनः यावे व सोबत ही पिशवी जरूर आणावी. आणि पर्यावरणाला जपावे.” रिलायंस फ्रेशच का ? प्रत्येक मॉल, प्रत्येक दुकानात ते दुकान घरगुती वस्तूंचं असो, किराणा असो, कापडाचे असो किंवा इतर कसले तरी दुकान असो. कापडी रिसायकल केलेल्या पिशव्या दिल्या गेल्या तर पर्यावरणाला अत्यंत

प्लास्टिक कचरा
उपयोगी पडतील.
जेव्हा पासून पिण्याचे पाणी विकायला सुरुवात झाली आहे तेव्हा पासून आपण प्रवासाला निघतांना पाण्याची व्यवस्था सोबत घेऊन निघायचे विसरलो आहोत.किंवा कोण नेईल हे ओझे असे म्हणून सोडून देतो. प्रवासात मग आपण १०-१२ रुपयाला पाण्याची बाटली विकत गेतो आणि पाणी पिऊन संपले की सहज म्हणून फेकून देतो. त्या बाटल्या रिसायकल होतात म्हणून ठीक आहे नाही तर किती कचरा जमा झाला असता. कचरा फेकातांना आपल्याला असे वाटते की ह्या पृथ्वी तालावर आपण एकटेच आहोत. फक्त आपणच कचरा फेकत आहोत त्यामुळे काय होणार एकट्याने कचरा फेकल्याने काय मोठा गहजब होणार आहे का? असे उद्धटपणे बोलून ही जातो. पण मित्रांनो या धरेवर आपण एकटे नाही. विचार करा ज्या रस्त्यावरून आपण जात आहोत तेथून दिवसातून १०००० लोकांनी प्रवास केला त्यातील एक टक्का लोकांनी जरी रोज अश्या बाटल्या फेकल्या तर दररोज शंभर बाटल्या जमा होऊ शकतील.
म्हणून आपण आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगायला हवा. आणि पर्यावरणाला पोषक अशाच वस्तूंचा दररोज वापर करायला हवा.