हल्ली इको फ़्रेन्डली चे जग आहे. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम काय होऊ शकतो याची जाणिव आता सरकारला होऊ लागली आहे ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. माझे असे म्हणण्याचे कारण की आता शासनाच्या वेब साईट वर ईको फ़्रेन्डली होळी साजरी करा, ईको फ़्रेन्डली घरांनाच बांधकामची परवानगी द्या असे सांअगण्यात येत आहे. This seems to be a positive sign. मी या माझ्या मनावर ईको फ़्रेन्डली हाऊस बद्दल च्या काही संकल्पना या पुर्वी मांडल्या आहेतच आज या बद्दलची आणखि एक संकल्पना मी आपल्या पुढे सादर करित आहे.
माझ्या ईकोफ़्रेन्डली हाउस या लेखात मी पुर्व पश्चिम घर असेल तर शुध्द हवा कशी मिळते हे दाखविले होते. त्याच धरतीवर हा आजचा लेख आहे.
माझ्या इकोफ़्रेंडलि हाऊसच्या संकल्पने प्रमाणे प्रत्येक मनुष्य पुर्व पश्चिम असे घर बांअधणे शक्य होणार नाही. त्यावर एक तोडगा असु शकतो. एखादी कोलोनी ( वसाहत) बांधण्यासाठीचा प्लोट्च पुर्व पश्चिम घ्यावा. तसे केल्याने बरेच फायदे होऊ शकतिल. ते कसे बघा.
या खालिल रेखा चित्रात मी ते स्पश्ट केले आहे. आधि चित्र बघा मग लगेच लक्षात येईल.

MY DREAM PLAN OF ECO-FRIENDLY COLONY
सोबतच्या चित्रामधे जे रंगीत ठोकळे आहेत ती खर म्हणजे इमारती आहे. म्हणजे ही एक वसाहत आहे. आपल्याला माहित आहेच की वारा नेहमी पश्चिमेकडुन पुर्वे कडेच वाहतो त्यामुळे प्र्त्येक दोन इमारतींच्य मधिल मोकळ्या जागेतून वारा वसाहतीम्धे प्रवेश करेल. दोन इमारती मधे डक्ट तयार झालेली असल्याने वारा कोम्प्रेस होऊन प्रवेश करेल म्हणजे त्याचा वेग वाढलेला असेल. आपल्याला माहित आहेच की हवा कोम्प्रेस झाल्याने गार होते. अहो, म्हणुनच आपण घराघरात पंखे वापरतो. हा कोम्प्रेस झालेला वारा पहिल्या गल्लिला क्रोस करेल तेव्हा त्याला मोकळी जागा मिळेल आणि तो त्या मोकळ्या जागेत पसरण्याचा प्रयत्न करेल. असे करतांना ती हवा दोन नंबरच्या लेन मधिल घरांमधे ज्या उघड्या खिडक्या किंवा दार आहेत त्यात शिरायचा प्रयत्न करेल.
अशा प्रकारे माझी कल्पना आहे की या आदर्श वसाहतीतील प्रत्येक घरात शुद्ध व गार हवा सतत खेळती राहिल. त्याने विजेची बचत होईल कारण विजेचा पंखा कमित कमित वेळ चालवावा लागेल.
सरकारने अशा प्रकारचे प्लान प्रत्येक शहरात व गावात डेव्हलप केले तर विचेची खुप मोठ्या प्रमाणात बचत होईल. त्यामुळे विजेचा उपयोग अत्यन्त महत्वाच्या अशा
शेती साठि व उद्योगांसाठी करता येऊ शकेल.
माझ्या कल्पनेतील असे ईकोफ़्रेन्डली वसाहत ज्या मधे वरील प्रमाणे प्लान, रेन वाटर हार्वेस्टिंग, ज्या घराला येअर कंडिशनरची गरज नाही व इतर ही फायदे असतील अशी एक जरी वसहत तयार झाली तर मी धन्य झालॊ असे समजेल. मला त्याचे क्रेडि्ट मिळो अगर न मिळो काही फरक पडत नाही.
मी येथे हे वाक्य लिहिण्याचे कारण असे की मी १९८७-८८ मधे मुंबईमधुन पब्लिश होत असलेल्या Science Age (कालांतराने हे मासिक बंद पडले) या मासिकात मुंबईमधे दर पावसाळ्यात साठत असणार्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय योजना सुचविली होती. २६ जुलाई ला झालेल्या घटनेने पुनः माझ्या मनाला जाग्रुती आली आणि चर्चे दरम्याने एका मित्राने सांगितले की अशी उपाय योजना दादर ला केलेली आहे. मन दुखावले गेले.