आताच मी मार्केट मध्ये फिरायला गेलो होतो. मी पहिले आज रविवार असून ही सर्व दुकानदार आरामात ग्राहकांची वाट बघत बसले होते. त्यांचे चेहरे निराश दिसत होते. मला असे निदर्शनास आले की फक्त मॉल, मोबाईल, भाजीपाला, किराणा, औषधं, खाद्य पदार्थ व दारू च्या दुकानांमध्ये गर्दी होती. इतर दुकान अक्षरश: रिकामी होती. यावरून मी असा निष्कर्ष काढला की हल्ली रविवारला जोडून जर सुटी आली की सर्व सहकुटुंब फिरायला जातात. तसेच फक्त जीवनावश्यक वस्तू व चैनीच्या वस्तू घेण्याकडेच सर्वांचा कल दिसतो. बाकी आहे काय आयुष्यात?
“Everybody enjoying the life.”
हळू हळू आपण पाश्चीमात्याकडे वळत आहोत की काय असे वाटू लागले आहे.