तंत्रज्ञानाचा जितक्या गतीने विस्तार झाला तितक्याच गतीने आपण त्याला विसरत ही गेलो.
दररोज नवनवीन मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहेत. काल जो मोबाईल आपल्याकडे होता, तो आज चालवायला होत नाही. जितक्या गतीने तंत्रज्ञानात बदल होत आहे तितक्याच गतीने आपली बुद्धी विसरत जाते. आपल्या मागच्या मोबाईल बद्दल आपण सर्व विसरून जातो.
मला ३० वर्ष्यापूर्वीचा कार्यालयाचा फोन नंबर आठवतो पण आताचे नंबर पाठ होत नाही. कारण आपल्या सुप्त बुद्धी ला ही कळते मोबाईल हातात आहे मग पाठ का करावे? लहान पणी पाठ केलेले पाढे पाठ आहेत अजून ही. आताच्या विद्यार्थ्यांना पाढे जमत नाहीत.
तंत्रज्ञानाने नवीन जग पहायला मिळते पण खर जग आपण विसरून जातो. आपण व्हर्च्युअल जगात जगतो आहोत.