ब्रम्हांडात अजून तरी माहिती नाही, पण कदाचित संपूर्ण धरणीवर जगण्यासाठी जी पंचमहाभूते आवश्यक आहेत त्यातील वायु ही एक आहे. प्राणवायू अर्थात ऑक्सिजन हा त्याच वायुमंडलातील एक घटक असून तो ऑक्सिजन शिवाय कुठल्याही जिवंत मानव अगर प्राण्याला जगणे अशक्य आहे. ज्याने या ब्रम्हांडाची परिपूर्ण विचार करून निर्मिती केली त्या अद्रुष्य शक्ती ला दंडवत प्रणाम.
जेव्हा पासून हे ब्रम्हांड अस्तित्वात आले आहे तेव्हा पासून ही पंचमहाभूते व पर्यायाने ऑक्सिजन अस्तित्वात आहे. पण असा गैसचे ब्रम्हांडात अस्तित्व शोधून काढले ते प्रथम सन १७७२ मध्ये कार्ल शैले या वैज्ञानिकांनी. परंतु त्यांचा लेख १७७७ पर्यंत अप्रकाशित राहिला. दरम्यान सन १७७४ मध्ये जोसेफ प्रिसले यांनी मरक्युरी ऑक्साईड गरम करून ऑक्सिजन तयार केली.
कदाचित तेव्हा या दोन्ही महानुभावांना ऑक्सिजन हा प्राणवायू असून जगण्यासाठी अत्यावश्यक आहे हे माहीत ही नसेल. विशेष म्हणजे या दोन्ही पैकी कोणीही या वायुचे ऑक्सिजन हे नामकरण केलेले नाही. हे काम केले आहे एंटोनी लैवोइजियर यांनी.
तत्पूर्वी कुठल्याही वस्तुला जळण्यासाठी एक बाहेरील घटक आवश्यक असतो असे बऱ्याच वैज्ञानिकांनी शोधून काढले होते पण परिपूर्ण माहिती नव्हती. शाळेत हे आपण शिकलो होतो पण आता लक्षात नाही.
हल्ली टिव्हीवर ऑक्सिजन वर रणकंदन सुरू असल्याने गुगल बाबांना माहिती विचारली तर ऑक्सिजनचा इतिहास अत्यंत रोचक आहे असे दिसले. असो.
मित्रांनो, ह्या कोरोनाने संपूर्ण जगाला ( चीन वगळून) वर्षभरापासून ऑक्सिजनवर ठेवले आहे. प्रत्येक मनुष्य धाकात जगत असेल; अर्थात ही माझी समज असावी कारण हे खरे असते तर लोकांना मास्क वापरायचे कायदे करून ही परत परत सांगावे लागले नसते. मास्क लावल्याने ऑक्सिजन कमी पडून गुदमरते म्हणून तो मास्क खाली गळ्यात केला जातो असे कारण सांगतात. हे काही प्रमाणात खरे ही आहे. पण आतापावेतो सवय व्हायला हवी होती. एक माझा अनुभव आहे की मानसिकता तयार केली तर दिवसभर जरी मास्क राहिला तरी त्रास जाणवणार नाही. सुरुवातीला मला ही गुदमरल्या सारखे व्हायचे. आता काही ही त्रास होत नाही. दोन तीन तास बाहेर राहिलो तरी काही वाटत नाही.
पण बाबांनो, असे मास्क लावून गुदमरणे सहन केलेले योग्य कि कोरोनाने कायमस्वरूपी गुदमरून मेलेले योग्य? आता हे तुम्हीच ठरवा . हे मी नव्हे तो यमराज म्हणत असेल हो.
अहो, बातम्या बघा. देशभरातून ऑक्सिजन की कमतरता असल्याच्या बातम्या येत आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण विनाकारण घराबाहेर पडू नये.
ज्याचं जळतं त्यालाच कळतं. प्रसंग उदभवल्यावर आपण काहीच करु शकत नाही याचे भान ठेवा.
आता प्रत्येकाला निसर्गाने दिलेल्या बहुमुल्य वायुचे महत्त्व कळत असावे. म्हणून तर जो तो ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन घरात ठेवत आहे. कदाचित मला काही झाले तर? अशा भिती ने सर्व घाबरत आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. हे भविष्य काळासाठी चांगले संकेत नाहीत मित्रांनो.
दोन तीन दिवसांपूर्वी बातमी वाचली होती की डॉक्टर म्हणतात आम्हाला प्रश्न पडतो म्हाताऱ्या रुग्णांना वाचवायचे कि तरुण रुग्णांना?
अशावेळी तरुण रुग्णांना वाचविणे महत्त्वाचे असते. त्यांना प्राधान्न्य दिले जाते. जे योग्य ही आहे.
म्हणून म्हणतो मित्रांनो, शक्य तोवर घरीच थांबलेले बरे. खूपच गरज असेल तरच बाहेर पडले पाहिजे. विनाकारण रस्त्यावर गर्दी करु नये.
घरीच रहा सुरक्षित रहा.
झाडे लावा झाडे जगवा
(03321849)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं…किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती आणले, हे जास्त महत्त्वाचं…
काळजी घ्या, सुरक्षित रहा….
——————————————————-
💐 शुभ सकाळ 💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.Ownpoems.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐