माझ्या लहानपणी मी असे ऐकले होते कि पूर्वी पैसाच अस्तित्वात नव्हता. तेव्हा लोकं शेतात जे पिकायचे ते अदली बदली करून जीवन यापन करित असत. नंतर मला कवळी पैसा म्हणून वापरली जाऊ लागली. हळूहळू बदल होत गेला. धेला, आणा, चार आणे आठाणा,रुपये असा काहीसा प्रवास सुरू झाला. नंतर जसजसा काळ लोटत गेला जूनी नाणी बंद होत गेली. मेट्रिक पध्दत सुरू झाली आणि सर्वच बदललं. काही वर्षांपूर्वी पर्यंत चार आणे व आठ आणे सुरू होते. पण नंतर ती बंद झाली. अजूनही काही लोकांकडे ती नाणी असावित. पूर्वी लाखभरामध्ये मिळणारी घरं आता पन्नास लाखाच्या घरात पोहोचली आहेत. माझ्या जेव्हा पासून आयटी क्षेत्र उदयास आले आहे पैसा खूप मोठा झाला आहे. त्या आधी एम बी ए हे मेनैजमेंट चा अभ्यासक्रम आला पगार भरमसाठ वाढले. सर्व तिकडे वळले. मग आले आयटी आणि मग काय सांगता. अगदी लोकं नुकतेच पास आऊट मुलं सुद्धा कोटी मधे पगार घेऊ लागले. सुमारे वीस वर्षापूर्वी मी मित्रांना म्हणायचो, आज तुम्ही खिशात पैसे घेऊन जातात आणि पिशवी भाजीपाला आणता. नंतर अशी वेळ येईल की पिशवीत पैसे घेऊन जाणार आणि हातात भाजीपाला आणणार. आज तिच परिस्थिती आली आहे मित्रांनो. असो. निसर्ग चक्र हे सुरू राहणारच आहे. ते थांबणार नाही. पण आज अशी परिस्थिती आहे की पैसा काही ही करु शकत आहे. मानव अंतरिक्ष भ्रमणाच्या उंबरठ्यावर येऊन धडकला आहे. बस फक्त पैसा हवा. नुकतेच एका धनाढ्य माणसाने स्वतः अंतरिक्ष भ्रमण केले. स्वतः ची तशी कंपनी आहे त्याची. त्याचे नाव आहे रिचर्ड ब्रैडसन आणि कंपनी चे नाव आहे स्पेस गेलेक्टिक. त्याने 2004 मध्ये घोषणा केली होती की तो लवकरच लोकांना अंतरिक्ष भ्रमण करण्यासाठी सुरूवात करणार. 17 वर्षांनी त्याचे स्वप्न पूर्ण झाले. सत्तरीत तो स्वतः अंतरिक्ष फिरून आला. आता लवकरच सामान्य माणसाला अर्थात फक्त पैसेवाल्यांना अंतरिक्ष भ्रमण करणे सहज शक्य होणार. (आणि त्यातून भरमसाठ पैसे कमवणार.) काही कालावधी लोटला कि त्यात ही होड लागणार. कारण जगात बोटावर मोजता येतील इतक्या लोकांकडे जगाची अर्धी संपत्ती एकवटली आहे. मला तर वाटते पन्नास शंभर वर्षांनी जसे पूर्वी राजे महाराजे होते तसे धनाढ्य लोकं जगावर राज्य करतील. मग पुन्हा हुकुमशाही जन्माला येऊ नये म्हणजे मिळवली. शेवटी हे ही निसर्गचक्रच आहे. गोल फिरुन पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडते. एकमात्र नक्की कि भविष्यात या लोकांची मोठमोठी महालं या अंतरिक्षात म्हणजे ग्रहांवर असतील. आणि हजार वर्षांनी त्या ग्रहावरील लोक आपल्या कडे अंतरिक्ष मानव म्हणून भ्रमणाला येतील. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐( 6421880 ) 💐💐💐💐💐💐💐💐💐
स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदाचित ती अश्रूंबरोबर वाहून जातील….. …
ती ह्रुदयात जपून ठेवलीत तर
ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल….!
🌹शुभ दिवस🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.ownpoems.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐