प्रार्थना…

🙏🙏सुप्रभात🙏🙏

मनाचा गाभारा तृप्त असेल तर ………………. बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या भल्याची प्रार्थनाच असते………!

मनू-का?

मित्रांनो, गेल्या वर्षी मुलीने मांजरीचे पिल्लू दत्तक घेऊन घरी आणले होते. (हो, प्राण्यांना ही दत्तक घेता येते.) तत्पूर्वी कधी ही आम्ही कोणीही कुठल्याही प्राण्याच्या जवळ गेलो नव्हतो. त्यामुळे त्याला जवळ घेणे म्हणजे एक दिव्य होते. माझी व मिसेस ची प्रक्रुति बरी नसते म्हणून तिला सांभाळणे अशक्य झाले शेवटी आम्ही दुसऱ्या एका व्यक्ती ला तिला दत्तक दिले. पण ती कायमचे मनात घर करून गेली. नेहमी तिची आठवण आम्हा सर्वांना येत असते. खालील फोटो हा तिचाच आहे. खूप निरागस आणि शांत स्वभावाची होती ती.

२६ सेप्टेंबर २०२१ च्या रात्री सुमारे १०.३० वाजेला रस्त्यावरून मांजरीच्या पिल्लू चा रडण्याचा आवाज आला आणि आमच्या मुलीचे लक्ष्य तिकडे गेले. बालकनीतून पाहिले तर रस्त्यावर एकटे पिल्लू फिरत होते. कदाचित रस्ता विसरले असेल. बराच वेळ वाट पाहिली. कोणीच आले नाही. मग मुलीने आग्रह धरला. इतक्या रात्री ते पिल्लू बिचारे कुठे जाणार. आपण त्याला घेऊन येऊ. सकाळी पाहिजे तर सोडून देऊ. मी पण तिचा बापच. मला ही दया आली. आणि आम्ही दोघे तिला घरी घेऊन आलो. ती लगेच आमच्यात रुळली. इच्छा असूनही तिला सोडून देता आले नाही. बर्याच वेळा खाली बगिच्यात घेऊन गेलो. तिची नजर चुकवून घरात आलो. थोड्या वेळाने ती दारात हजर असायची. पुन्हा जिन्यावरून खाली जायचा प्रयत्न केला. तळाशी गेलो कि लगेच धावून घरात पळत जाणार. म्हणजे तिला कळत असावे कि हे मला बाहेर सोडायचा विचार करत आहेत असे. हळूहळू तिच्यात जीव रमत गेला आणि आता तर ती घरातील एक सदस्य होऊन बसली आहे. पण तिचा सांभाळ कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. असो. आता तर ती माझ्या मुलीसारखी झाली आहे. मी तिला बेटा बेटा करत असतो. बायको तर म्हणते ती माझी आई म्हणजे तिची सासू आहे. मग मला ही तिच्यात आई दिसते. मुलगी म्हणते ती तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे जे लहानपणी वारले. असो हे आम्ही गमतीने म्हणत असतो. पण मन कधी तिच्यात गुंगत गेले कळलेच नाही. एक मात्र झाले कि माझा वेळ तिच्यामुळे कसा निघून जातो कळत ही नाही. दिवसभर तिच्या भोवती फिरत असतो आणि ती माझ्या भोवती असते. ती नाही दिसली कि अस्वस्थ होते. तिला येऊन दोन तीन दिवस झाले असताना मी तिला म्हटले मनु का तू? आणि तिचे नाव मनुच पडले. तिला ही ते नाव खूप आवडते. मी तिला मनु बेटा असा आवाज दिला कि हुं…… असा होकार देते. आणि धावतच जवळ येते.

ही आमची मनू

माझी तर अत्यंत लाडकी झाली आहे ती. खूप मस्ती करत असते.

आठवण…

आठवण येणे*
‘आणि’
आठवण काढणे
यात खुप फरक आहे….!
आपण आठवण त्यांचीच काढतो,
जे आपले आहेत………!
‘आणि’
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात………!🙏*🌹शुभ प्रभात🌹*🙏

अहो ऐकलत का??

आरोग्य….

मित्रांनो, आज २९ सेप्टेंबर. आजचा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मागच्या दोन-तीन दशकात तंत्रज्ञानाची खूपच प्रगती झालेली आहे. विशेष करून डिजिटल क्षेत्रात तर खूपच. पण डिजिटल हे कागदावर असत. त्यासाठी मशिन ही लागतेच. मशिन असेल तरच डिजिटल चा उपयोग होतो. असे म्हणणे योग्य होईल कि मशिन चालविण्यासाठी डिजिटल चा उपयोग केला जातो. आणि मशिन अभियंता तयार करतो.

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त वर्तमान पत्रात एक लेख आला आहे. तो मी येथे शेअर केला आहे. त्यावरून मला ही पोस्ट लिहावीशी वाटली. सध्या इतकी प्रगती झाली आहे कि तुमचं ह्रदय स्मार्ट फोनशी जोडलं जात आहे. आणि स्मार्ट फोन तुमच्या डॉक्टरांशी जोडला जातो आहे. तुमच्या ह्रुदयात काही ही गडबड जाणवली कि स्मार्ट फोनवर त्याची क्षणार्धात नोंद होऊन संबंधित डॉक्टरांना संदेश पोहोचतो. आणि लागलीच तुमच्याशी डॉक्टर फोनवरून संपर्क साधतात. मार्गदर्शन करतात आणि जवळच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून योग्य उपचार देतात. म्हणजे तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जरी असला तरीही असहाय नसणार. लगेचच तुम्हाला आरोग्य मदत उपलब्ध होऊन तुमचे प्राण वाचू शकतात. किती ही प्रगती. मला वाटते सन २००० नंतर जग झपाट्याने बदलत गेले. अर्थात तंत्रज्ञानाच्या बाबतीत. जास्त माहिती साठी सोबतचा लेख वाचा. असो जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा👍👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🙏शुभ सकाळ🙏 अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही,आणि माणूसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही.
लाख नाही कमावलेत तरी चालेल ,पण लाखमोलाची माणसं कमवा आणि आयुष्यभर टिकवा…
आयुष्य कितीही सुंदर
असले तरी आपल्या
माणसां शिवाय अपूर्ण
आहे… 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जीवन काय आहे…

मित्रांनो, जीवन काय आहे. आईवडिलांनी जन्माला घातल म्हणून हे जग पाहिले. हळूहळू मोठे झालो. शिकलो सवरलो, नौकरी मग लग्न मग मुलबाळ मग म्हातारपण मग परतीचा प्रवास. बस्स. इतकंच. याच साठी हा अट्टाहास!! मोठमोठ्या दार्शनिकांनी जीवनाचे विविध अर्थ सांगितले आहेत. विविध पैलू उलगडून सांगितले आहेत. पण तरीही मला वाटते जीवन म्हणजे नक्की काय हा उलगडा अद्याप तरी कोणाला झाला नसावा. एका महापुरूषाने जीवनाला काय म्हटले आहे ते पहा.

Life is a long headache in a noisy street.” — John Masefield म्हणजे काय तर एका “कोलाहलपूर्ण रस्त्यावरील मोठ्ठी डोकेदुखी म्हणजे जीवन.” John Medfield हा १९ व्या शतकातील एक मोठा इंग्रज कवि होता. त्याला ही हे जीवन म्हणजे निव्वळ एक डोकेदुखीच वाटली तर. आणखी एक महापुरुष जीवनाबद्दल काय म्हणतो ते पहा.

Life is a misery to be born, a pain to live, a trouble to die. ” St. Bernard of Clairvaux. आता याला काय म्हणावे बर. याने तर जन्मापासून मरणापर्यंत दुखच दुख अशीच व्याख्या करून टाकली या जीवनाची. जन्मासाठी पण दुःख, जगण्यासाठी तर दुःखच, पण मरण्यासाठी सुद्धा दुःख. दुसरा एक महापुरुष काय म्हणतो ते बघा.

There is no cure for birth and death save to enjoy the interval ” -Santayana. जन्म तर तुम्हाला घ्यावाच लागतो. त्याला काही इलाज नाही. आणि मरण हे मधला काळ आनंदाने जगण्यासाठी जपून ठेवलेले आहे. मी पण जीवनावर बरच काही लिहिले आहे. एक कविता लिहिली होती मी

जीवन एक कादंबरी आहे फरक एव्हढाच कि कादंबरीची पाने आपण पलटू शकतो जीवन रूपी कादंबरीची नव्हे.

जीवनावर मी एक हिंदी कविता केली आहे शिर्षक आहे, ” जिंदगी एक सफर है” खाली दिली. वाचा.

जिंदगी एक सफर है
आज यहां कल वहां
परसो कही और है।।
जिंदगी एक गाना है,
प्यार से गाओ
तो लगता सुहाना है।।

जिंदगी एक मिल्कीयत है
जीसका कोई मोल नही
यही इसकी खासियत है।।

माझी आणखी एक हिंदी कविता. शिर्षक आहे ” जिंदगी एक तमाशा है।”

ज़िन्दगी एक तमाशा है,
कुछ पाने की आशा है।
पर हाथ लगी,
कभी आशा कभी निराशा है।
ज़िन्दगी एक तमाशा है..

ज़िन्दगी बुलबुला ये पानी है,
पल में फटने से
जो ख़त्म हो जाए
वो इसकी कहानी है,
पहले बचपन
अंत में बुढ़ापा,
बीच में जिसके ज़वानी है

अशा अनेक कविता आहेत. यासाठी माझा हिंदी ब्लॉग “कुछ पल” ला अवश्य भेट द्यावी आणि हो वाचून प्रतिक्रिया ही द्यावी. लिंक येथे देत आहे http://www.koshtiravindra.blogspot.com

बिछडे सभी बारी बारी…..

गुरुदत्त या कलाकाराचा एक सिनेमा होता “कागज के फूल”. त्यातील एक गाणे होते…

देखी जमाने की यारी, बिछडे सभी बारी बारी

क्या लेके मिले अब दुनिया से, आँसू के सिवा कुछ पास नही

या फूल ही फूल थे दामन में, या काँटों की भी आस नहीं

मतलब की दुनिया है सारी, बिछडे सभी बारी बारी

दुखाने ओतप्रोत भरलेला हा सिनेमा मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाला आणि गुरुदत्त ने नंतर जीवनच संपवलं. असा एका सिनेमा पर्वाचा अंत झाला.

मुद्दा हा नाहीच. मुद्दा आहे हे भावनिक गीत. तशी या चित्रपटातील सर्वच गाणी भावनिक होती. दिल को छू जानेवाली म्हणतात न तशी. गाण्यांचे बोल, शब्द रचना अक्षरशः काळजाला भिडते राव.

देखी जमाने की यारी. या पहिल्या कडव्यात च दर्द आहे. देखी जमाने की यारी म्हणजे जगाचे प्रेम बघितले. यातच गहरा दर्द लपलेले आहे. माझ्या मते हे उपरोधक आहे. म्हणून यात दर्द वाटतो. कारण लगतच्या ओळीत निकले सभी बारी बारी… असे आहे. दोन्ही ओळी मिळून अर्थ काढला “तर व्वा काय प्रेम आहे, एक एक करत सर्वच निघत आहेत.” असा असावा असे मला तरी वाटते. आयुष्यात डोकावून पाहिले तर हे असेच आहे असे वाटते. कारण जग मतलबी आहे असेच वाटते. लहानपणापासून जर आयुष्याच चलचित्र डोळ्यासमोर आणलं तर दिसून येते कि एक एक मित्र आयुष्यात आला कालांतराने निघून गेला. असे वाटून जाते कि त्याचे काम झाले म्हणून तो निघून गेला. कदाचित त्याला आपल्या कडून तितके प्रेम मिळणे अपेक्षित असावे किंवा आपण त्याला तितकेंच प्रेम देणे लागत असावे. किंवा आपल्याला त्याच्या कडून इतकेच प्रेम घेणे असावे. काय असावे हे कोणीच सांगू शकत नाही. पण असं कोणी आयुष्यातून निघून गेले तर फार वाईट वाटते. असे वाटते इतक निष्ठूर कसं असू शकतं हे जग?? पण आपण काही करू शकत नाही. जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे. मित्रांनो, ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोणाच्या आयुष्यात येत नसते.

वय झाले कि असच होत जात. एक एक जण या वलयातून निघत जातो. शेवटी शेवटी तर अक्षरशः एकांतवास भोगावा लागतो. दिर्घ आजार असेल तर घरचे ही जवळ येत नाहीत तर परक्यांचे काय! अशावेळी मनुष्य ईश्वराच्या विनवण्या करतो कि मला घेऊन जा. भोग हे कोणालाच चुकलेले नाहीत. भोगायचे असेल ते भोगावेच लागणार. अहो, श्रीकृष्ण भगवान च्या आईवडिलांना सुद्धा दिर्घकाळ कारावास भोगावाच लागला होता न. जेव्हा आई देवाला विचारते कि तू तर देव होतास मग आम्हाला हा कारावास का भोगावा लागला? तेव्हा देव म्हणतात, माते तू नाही का मला चौदा वर्षे वनवास भोगायला पाठवले होते मागच्या जन्मी! म्हणजे देवाला सुद्धा भोगावेच लागते न. असे जीवन आहे मित्रांनो. सर्व जाण्यासाठी च येत असतात मग ते आयुष्यात असो वा जगात. कोणीही येथे कायम थांबले नाहीत.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.koshtirn.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_
🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
☺ शुभ सकाळ ☺

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

इच्छापूर्ती…

मित्रांनो, जेथे मन असते तेथे इच्छा असते. मग तो माणूस असो कि प्राणी. जीवंत जीव असेल तर त्याची इच्छा ही होतेच. मग ती गोडधोड खायची असो कि ग्रंथ वाचणाची किंवा काही तरी जिन्नस पदार्थ खायची. अहो कधी कधी गोड नव्हे तर चक्क तिखट खायची इच्छा होते. कधी कधी गम्मत च होते बघा. गोड खाल्ले तर तोंड गोडगोड होत. जास्त गोड पदार्थ असला तर बराच वेळ जीभ गोड असते. मग मात्र कंटाळा येतो. मग काही तरी तिखट खायची इच्छा होते. मग तिखट खायला मागतो. बरोबर आहे तुम्ही एकटे थोडेच आहात घरात! आणि स्वयंपाक खोलीत जायचीच बंदी केली गेली असेल सेवानिवृत्त माणसाला तर तो बिच्चारा ती बायको ने रेखाटलेली अद्रुष्य लक्ष्मण रेखा स्वप्नात तरी ओलांडायची हिम्मत करू शकेल का हो? नाही न. हाच अनुभव संपतरावांना उठसूट येत असतो. पण ते बिचारे काहीच करू शकत नाहीत. हात चोळत बसतात. नाही तर एका खोलीत जाऊन गुपचूप भिंती वर राग काढून मोकळे होतात.😊☺️😢 पण विषय हा नाहीच आहे मुळी. विषय वेगळाच आहे. अहो परवा सौ. स्वयंपाक घरात होत्या. संपतरावांनी आवाज दिला, “अहो, मला थोडा चहा हवा होता.” बस मग काय? सौं.ची चक्री सुरू झाली की राव. “ही काय चहाची वेळ आहे. किती वेळा चहा घ्यायचा माणसाने? उठसूट चहा चहा. ” राग राग राग आणि राग. “अहो, आता परवाच आपल ठरल कि दिवसातून चार वेळा चहा मिळेल म्हणून.” असे संपतराव म्हणाले. आता पुन्हा सुरू झाली कटकट. संपतराव कंटाळले. आणि मैदान सोडून निघून गेले. पण त्यांची चहाची तलब काही केल्या जात नव्हती. थोड्या वेळाने परत ते किचन कडे वळले. सौ.च्या लक्षात आले की स्वारी डोकावत आहे. “आले, लक्षात आले बर का! थांबा थोडे. पण मी काय म्हणते? अहो, मी कामाच्या व्यापात काही बोलले रागावले तर गुपचूप ऐकून घ्यायला काय होते.” “अग पण विनाकारण?” संपतराव. “मग काय त्यात. मी कोणावर रागावणार मग. मुलं आता मोठ्ठी झालीत. त्यांना काही बोलता येत नाही. माझी पण इच्छा होते रागवायची कधीतरी. तर स्वारी ऐकून घ्यायला ही तयार नाही. इतकी इच्छा ही पूर्ण करू शकत नाही तुम्ही माझी.” सौ. उवाच. संपतराव आ वासून सौ.कडे बघतच राहिले. त्यांना असे बघून सौ. हसल्या. मग दोघे मनसोक्त हसले आणि चहाची इच्छा पूर्ण झाली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_
🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
☺ सुप्रभात ☺

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐www.ownpoems.wordpress.com💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कढीपत्ता…

आपल्या रोजच्या जेवणातील कढीपत्ता हे अत्यंत उपयुक्त व आवश्यक घटक मानले गेले आहे. बहुतेक भाज्यांमध्ये न चुकता हा पदार्थ घातला जातो. हा मसाला म्हणून मानला गेलेला पदार्थ आहे. गोडलिंब म्हणून ही याला ओळखले जाते. भारतात याला एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून ही ओळखले जाते. याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडँट, अँटिडायबेटिक, अँटिइंफ्लेमेटरी म्हणजे सूज प्रतिबंधक असे गुण असतात. याशिवाय पदार्थ स्वादिष्ट ही बनतो.

विषय वेगळाच आहे. या झाडावर एक विशिष्ट प्रकारचा किटक वास करतो. हे आपल्याला कदाचित माहिती असेल ही. विशेष म्हणजे त्याचे वास्तव्य फक्त याच झाडावर असते. बर तो कायम या झाडावर राहत नाही. कसा येतो तेही माहिती नाही. पण अचानक उगवतो. पंख ही नाहीत त्याला. मग तो झाडावर कसा येतो माहित नाही. आणखी एक निरिक्षण केले कि तो नेहमी जोडीने येत असतो. दोन्ही म्हणजे कुटुंब एकत्र प्रवास करत असते. त्याचे फोटो मी काढले आहेत. खालील कोलाज बघा. भयानक वाटतो न. त्याची नजर बघा किती तिक्ष्ण आहे. भिती वाटते त्याला बघून. अगदी पानांसारखा हिरवा गडद रंग असतो. कारण तो पानं खाऊन जगतो.

मी त्याचा फोटो काढला आणि गुगल लेंस वर सर्च केले तर त्याची माहिती समोर आली. हा प्राणी लिंबाच्या झाडावर पण असतो. याचे विविध रुप बघायला मिळाले. हा citrus swallowtail caterpillar या नावाने ओळखला जातो. असे लक्षात आले कि या मोठ्या फुलपाखराचे लहानपणी चे रुप असावे. मोठा झाल्यावर याला पंख फुटत असावी.